एक्स्प्लोर
Maharashtra Superfast News : 8 AM : 8 च्या अपडेट्स : 19 OCT 2025 : ABP Majha
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर खोचक टीका केली आहे, तर दुसरीकडे मतदार यादीतील गोंधळावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. 'सगळ्या महाराष्ट्रामध्ये किती काही लोकांनी केलं, किती एकत्र आले, तरी त्यांच्या हातामध्ये लोक टिकल्या देतील', अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. यासोबतच, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना 'राजकीय नापास माणूस' संबोधत त्यांच्यावर टीका केली. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोग भाजपचा बाहुला बनल्याचा गंभीर आरोप केला असून, विधानसभा निवडणुकीनंतर अचानक ५० लाख मतदार कसे वाढले, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाने या आरोपांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत, तर नवी मुंबईत सिडकोच्या घरांच्या वाढीव किमतींविरोधात लॉटरी विजेत्यांचे आंदोलन सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















