Maharashtra Superfast News : 8.30 AM : 8 च्या अपडेट्स : 19 OCT 2025 : ABP Majha
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संभाव्य युतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार टीका केली आहे. 'महाराष्ट्रामध्ये कुणी कितीही प्रयत्न केले, एकत्र आले, आमच्या ठिकर्या उडतील, असं वक्तव्य केलं, तरी त्यांच्या हातामध्ये लोक टिकल्यास देतील', असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. दुसरीकडे, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना 'राजकीय नापास माणूस' म्हणत ते 'ढकल पास' होण्यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे. दरम्यान, मतदार याद्यांमधील घोळाच्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या तक्रारीनंतर, निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोग भाजपचा बाहुला बनल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement