Eknath Shinde On Mahayuti: 'युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत', एकनाथ शिंदे यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आगामी निवडणुकांमधील युतीबाबत (Alliance) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 'जिथे युती झाली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत कटुता येऊ नये,' असे स्पष्ट संकेत शिंदे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. जिथे-जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढावे, पण काही ठिकाणी जागा वाटप शक्य न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत करावी, मात्र एकमेकांवर कठोर किंवा टोकाची टीका टाळावी, असा कानमंत्र त्यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी महायुतीतील (Mahayuti) सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार की काही ठिकाणी वेगवेगळे लढणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement