Infra Deadline: 'पाच-पाच वर्षांची Timeline जगात कुठेच नसते', CM Devendra Fadnavis अधिकाऱ्यांवर भडकले!
Continues below advertisement
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पायाभूत सुविधांच्या (Infrastructure Projects) रखडलेल्या कामांवरून अधिकारी आणि कंत्राटदारांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. 'कामांसाठी पाच-पाच वर्षांचा वेळ मागू नका, अडीच वर्षांमध्ये काम पूर्ण करा,' अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. मुंबई, पुणे आणि ठाण्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेताना कामांच्या दिरंगाईमुळे मुख्यमंत्री कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसून आले. पाच, सात किंवा दहा वर्षे चालणारे प्रकल्प आम्हाला मान्य नाहीत, असे ते म्हणाले. यापुढे 'वॉर रूम'ने प्रत्येक प्रकल्पाचा दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. कामाचा वेग अत्यंत कमी असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना थेट इशारा दिला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement