Local Body Polls : 'निकालानंतर एकत्र येण्याचा निर्णय घेऊ', CM Devendra Fadnavis यांचे सूचक विधान
Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी महायुतीच्या (Mahayuti) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील रणनितीवर मोठे विधान केले आहे. 'निकालानंतर आम्ही निर्णय घेऊ की वेगळे जरी लढलं असू तरी एकत्र यायचं का?', असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी एका अनौपचारिक गप्पांमध्ये केले. यानुसार, ठाणे (Thane), पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) भाजप (BJP) स्वबळावर लढण्याचे संकेत आहेत, तर मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र लढतील हे स्पष्ट करण्यात आले आहे. जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत, तिथे वेगळे लढून निकालानंतर एकत्र येण्याची शक्यताही त्यांनी खुली ठेवली आहे. तसेच मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement