Human-Leopard Conflict: मुलाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ संतप्त, Forest Dept. ची गाडी आणि कार्यालय पेटवून दिलं
Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय पेटवून दिले. 'वनविभागाने बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा', अशी आक्रमक मागणी करत ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. पिंपरखेड गावात ही दुर्दैवी घटना घडली असून, गेल्या काही दिवसांतील बिबट्या हल्ल्याची ही तिसरी मोठी घटना आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने यावर तात्काळ ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेनंतर, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement