Central Team Visit: 'विरोधक केवळ राजकीय फोडी भासविण्याचा प्रयत्न करतायत', चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
Continues below advertisement
राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी अखेर नऊ सदस्यांचे केंद्रीय पथक (Central Team) दाखल झाले आहे. 'विरोधक केवळ राजकीय फोडी भासविण्याचा प्रयत्न करतायत, केंद्राची भूमिका राज्याला मदत करण्याचीच आहे', अशी भूमिका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मांडली आहे. राज्यात यंदाच्या अतिवृष्टीमुळे तब्बल अडुसष्ठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके वाया गेली आहेत, तर शहरी भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. तर, केंद्र सरकारने आतापर्यंत एक हजार पाचशे सहासष्ट कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित केला असल्याचे सांगण्यात येत आहे. हे पथक राज्यात झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेऊन आपला अहवाल केंद्राला सादर करणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement