Maharashtra Floods : केंद्राचे पथक महाराष्ट्रात दाखल, मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार

Continues below advertisement
केंद्रीय पथक महाराष्ट्रातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहे. हे पथक प्रामुख्याने मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागावर लक्ष केंद्रित करणार असून, केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडेय (R. K. Pandey) या पथकाचे नेतृत्व करत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडेय यांच्या नेतृत्वाखालील या पथकात आठ जणांचा समावेश आहे. हे पथक ३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होऊन, मंगळवार आणि बुधवारी विविध नुकसानग्रस्त भागांना भेटी देईल. या पाहणी दौऱ्यानंतर एक सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल, ज्याच्या आधारावर पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola