एक्स्प्लोर
Bachchu Kadu : '३० जून २०२६ च्या आत कर्जमुक्ती होणारच', बच्चू Kadu यांची ग्वाही; आंदोलन तूर्तास स्थगित
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी आंदोलन (Farmer Protest) तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली आहे. 'आम्ही जे दिलेला शब्द आहे तो ३० जून २०२६ च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही,' असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ३० जून २०२६ ही नवी डेडलाईन देण्यात आली असून, सरकारच्या आश्वासनानंतर आम्ही समाधानी असल्याचे कडू म्हणाले. यासोबतच, मेंढपाळांना जागा देणे, दिव्यांगांचे प्रश्न, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वसुली अटी आणि संगणक परिचालकांच्या मागण्यांवरही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. राजू शेट्टी, महादेव जानकर आणि वामनराव चटप यांसारखे नेतेही या आंदोलनात सहभागी होते. सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे आंदोलन तूर्तास स्थगित करत असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?
Akola News : तरुणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत, पत्र लिहिणारा लग्नाळू तरुण ABP Majha वर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















