Maharashtra Politics मुलगा 1800 कोटींची जमीन 300 कोटीत घेतो, हे वडिलांना माहित नाही?', दानवेंचा सवाल
Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. दानवे यांच्या मते, 'पार्थ पवार यांच्या कंपनीने १८०० कोटी रुपयांची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांना खरेदी केली आणि वडिलांना याची माहिती नाही, हे कोणाला खरं वाटेल का?'. या प्रकरणाची तुलना एकनाथ खडसे यांच्यावरील जमीन खरेदीच्या आरोपांशी करत, ज्याप्रमाणे झोटिंग समिती नेमण्यात आली होती, तशीच समिती नेमून चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप 'प्राथमिकदृष्ट्या गंभीर' असल्याचे सांगत चौकशीचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement