Makarand Anaspur : शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत'- अनासपुरे

Continues below advertisement
अकोला (Akola) जिल्ह्यातील निंबाफाटा येथे अंदुरा ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात (Farmers' Meeting) ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वाचे भाष्य केले. 'शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत,' असे स्पष्ट मत अनासपुरे यांनी एबीपी माझासोबत बोलताना मांडले. शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या समस्यांसाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध अडचणी आणि त्यावरील उपायांवर चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये अनासपुरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola