नागपूर : सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या मंदगतीवरुन उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2018 02:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सिंचन घोटाळाप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीच्या मंदगतीवरुन उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं आहे. चौकशीचं मॉनिटरींग पोलिस महासंचालक करतील असा प्रस्ताव कोर्टापुढं ठेवला होता. त्याला आता कोर्टानं एका आठवड्याची मुदत दिली आहे. एका आठवड्यात जर समाधानकारक चौकशी झाली नाही तर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येईल असं न्यायालयाच्या वतीनं सांगण्यात आलंय. सिंचन घोटाळ्याची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरु आहे.