मुंबई : स्वच्छता सर्वेक्षण 2018 नुसार मुंबई देशातील सर्वात स्वच्छ राजधानी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 May 2018 08:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देशातील स्वच्छ राजधानी म्हणून मुंबईनं बाजी मारली आहे, तर देशातलं सर्वोत्तम घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणारं शहर म्हणून नवी मुंबईला गौरवण्यात आलं आहे. इंदूर, भोपाळ आणि चंदीगढ यांना स्वच्छ शहरांचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारतर्फे देशभरात घेण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षण 2018 चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या योजने अंतर्गत देशातील राज्यांच्या राजधान्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये मुंबई महापालिकेने हा पुरस्कार पटकावला आहे.