Kisan Long Morcha : मुंबई : हजारो धर्मा पाटील सरकार बेचिराख करतील : सामना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2018 11:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेनं आज पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला.
सरकारने अर्थसंकल्पात फसव्या घोषणा करुन कष्टकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. धुळ्याचे धर्माबाबा पाटील या शेतकऱ्याने मुंबईत मंत्रालयात आत्महत्या केली.
आता जय किसानचा नारा देत हजारो जिवंत धर्मा पाटील मंत्रालयाच्या दिशेनं निघाले आहेत. आता त्यांचा आक्रोश आणि वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही, अशी कडवी टीका सामनातून केलीय.