मुंबई : विद्यापीठातील लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पुरवण्या मिळणार नाहीत!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Dec 2017 10:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई विद्यापीठात लॉच्या विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेला पुरवणी मिळणार नाही. उत्तरपत्रिकेच्या ऑनलाईन तपासणीत अडथळे येत असल्यानं हा निर्णय विद्यापीठातर्फे घेण्यात आला आहे. पुरवण्यांमुळे ऑनलाईन तपासणीत अडचणी येतात तसंच मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणीला वेगळा बारकोड असल्याने ऑनलाईन तपासणीदरम्यान गोंधळ उडतो, असं विद्यापीठाने म्हटलं आहे. तर दुसरीकडे विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठी उत्तरं लिहावी लागत असल्यानं उत्तरपत्रिका पुरत नाही, असं म्हणत विद्यार्थ्यांनी या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे.