Balbharati Maths | बालभारतीच्या दुसरीच्या पुस्तकातील बदल मागे घेतल्यास मंगला नारळीकर अध्यक्षपद सोडणार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jun 2019 10:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबालभारतीच्या गणितांच्या पुस्तकांमध्ये करण्यात आलेल्या बदलांनंतर मोठा वाद निर्माण करण्यात आला. मंगला नारळीकर यांच्या अध्यक्षतेखालील समीतीने गणीताच्या पुस्तकांमध्ये केलेले बदल मागे घेण्याची तयारी सरकारी पातळीवर सुरू असल्याची चर्चा आहे. त्यासाठी गणीताच्या पुस्तकांमधील काही पानं बदलण्याचा विचार सुरू आहे. मात्र आपल्याला अंधारात ठेवून गणिताच्या पुस्तकांमधे बदल केले गेले तर गणित विषयाच्या समितीच्या अध्यक्षपदी राहण्याची आपली इच्छा नाही असं मंगला नारळीकर यांनी म्हटलं.