माझा विशेष : सरकारी तिजोरीला घुशी लागल्यात?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2018 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा प्रश्न विरोधकांना विचारणाऱ्या फडणवीस सरकारलाच हा प्रश्न आज विचारला जातो आहे. कारण एका खासगी कंपनीनं जाहिरातबाजीसाठी पारदर्शी सरकारला कोट्यवधीचा चुना लावला आहे. एफरसन नावाच्या कंपनीला प्रॉडक्शनचं कंत्राट देण्यात आलं. मी मुख्यमंत्री बोलतोय, जय महाराष्ट्र, आणि दिलखुलास असे तीन कार्यक्रमाचं प्रॉडक्शन ही कंपनी करते. या प्रत्येक कार्यक्रमाच्या एका भागाच्या प्रॉडक्शनसाठी 10 लाखांचा खर्च आला आहे. वर्षभरातला प्रॉडक्शन आणि जाहिरात हा एकूण खर्च पाहिला तर साडेचार कोटींच्या घरात आहे. सरकारी विभागाकडूनच याचं विवरण एका पत्रकारद्वारे जाहीर करण्यात आलंय. म्हणजे, करदात्यांनी भरलेल्या कोट्यवधींचा चुराडा झाल्याचं खुद्द सरकारनं जाहीर केलं आहे. सरकारी तिजोरीला घुशी लागल्यायत की काय? अशी शंका यावी. कारण, पैसा कुठे गळून चाललाय याचा थांगपत्ताच या सरकारला नाही. ही मुख्यमंत्र्यांची डोळेझाक आहे की प्रशासन आणि खासगी कंपनी संगनमतानं सरकारला चुना लावत आहेत. पारदर्शी सरकारमध्ये चाललंय काय? खासगी कंपनी तुम्हाला कोट्यवधींचा चुना लावतेय. याची काही चौकशी होणरा आहे की नाही.