✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : Solapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे : सोलापुरचा पाणीप्रश्न कधी सुटणार?

विजय साळवी, एबीपी माझा   |  29 Jan 2025 11:01 PM (IST)

तुम्ही पाहाताय एबीपी माझा... आणि ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये आपलं पुन्हा स्वागत...
झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत महापालिकेचे महामुद्दे. आणि या विशेष सत्रात आज आपण पहिल्यांदा जाणार आहोत सोेलापूर शहरात. सोलापुरात पाण्याची समस्या आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. पण त्यासाठी धरणात पाणी कमी असणं हे कारण नाहीय. प्रशासकीय अनास्था हे त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. पण उजनी धरणाचं पाणी नेमकं मुरतंय कुठे? प्रशासन नेमकं कुठे कमी पडतंय यावरचा सविस्तर स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात. 


हा नळ पाहा. कोरडा ठाक. आठवड्यातील सहा दिवस या नळाला सुट्टी असते. कारण सोलापुरात पाच ते सहा दिवसांत एकदा पाणी येतं. हद्दवाढ भागात तर परिस्थिती आणखीनच बिकट आहे. 


पाच ते सहा दिवसांनी जेव्हा पाणी येतं, तेव्हा देखील ते कधी कमी दाबानं येतं, तर कधी दूषित पाणी येतं. त्रासात भर म्हणजे पाणी येण्याची कुठली ठरलेली वेळही नाही. यामुळे खासकरून महिला वर्गाचे प्रचंड हाल होतात. 


पाण्याची इतकी भीषण समस्या असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरातील सर्व निवडणुका या पाण्याच्या मुद्द्यावरच लढल्या जातात. मात्र तरीही नळाला पाणी येत नाही ते नाहीच. 


उजनी धरण ते सोलापूर शहर अशी ११० किलोमीटरची पाईपलाईन २०१७मध्ये मंजूर करण्यात आली. 


सुरुवातीला याची क्षमता प्रतिदिन ११ कोटी लीटर इतकी होती. 


मात्र भूसंपादन वेळेत न झाल्यानं प्रकल्प रखडू लागला 


प्रकल्प लांबल्यामुळे कंत्राटदार कंपनी देखील अधिक पैसे मागू लागली 


त्यामुळे प्रकरण लवादात गेलं 


२०२३ मध्ये लवादाचा निर्णय आला, त्यानंतर
कंपनीला फेरनिविदा देण्यात आली 


नंतर प्रकल्पाची क्षमता देखील वाढवल्यामुळे
सध्या प्रति दिन १७ कोटी लीटर क्षमतेच्या पाईपलाईनचं काम सुरू आहे 


या पाईपलाईनचं काम जवळपास पूर्ण होत आलं असलं तरी दुसरी एक समस्या आहेच. ती म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दीड वर्ष लागणार आहे. आणि म्हणूनच २०२५ सालातही सोलापूरकरांना आठवड्यातून किमान दोनदा पाणी मिळणं अशक्य दिसतंय. 


सोलापुरात अनेक समल्या असल्या तरी पाण्याची समस्या सर्वात भीषण आणि प्रत्येकाला भेडसावणारी आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत देखील हा मुद्दा गाजणार हे नक्की. आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर.


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : Solapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे : सोलापुरचा पाणीप्रश्न कधी सुटणार?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.