✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour IND vs BAN Test Match : कानपूर कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने मालिका जिंकली

विजय साळवी, एबीपी माझा  |  01 Oct 2024 11:06 PM (IST)
ABP News

तुम्ही पाहताय एबीपी माझा. आणि ब्रेकनंतर झीरो अवरच्या तिसऱ्या सत्रात तुमचं स्वागत. बातमी आहे कानपूरच्या मैदानातून.
 
रोहित शर्माच्या भारतीय संघानं कानपूरच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतानं या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असा निर्भेळ विजय साजरा केला. कानपूर कसोटी सामन्यात जवळपास अडीच दिवसांचा खेळ हा पावसानं वाया गेला होता. त्यामुळं ही कसोटी अनिर्णीत राहिल असा अंदाज होता. पण पहिल्या डावात वेगानं ५२ धावांची आघाडी घेऊन, भारतानं डाव घोषित करण्याचा घेतलेला निर्णय कसोटीला कलाटणी देणारा ठरला. भारतीय गोलंदाजांनी आपल्या संघव्यवस्थापनाचा तो निर्णय पाचव्या आणि अखेरच्या दिवशी अचूक ठरवला. त्यांनी चौथ्या दिवशीच्या दोन बाद २६ धावांवरून बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या १४६ धावांत गुंडाळला. जसप्रीत बुमरा, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळं भारतासमोर विजयासाठी अवघं ९५ धावांचं आव्हान होतं. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीनं तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या दिशेनं नेलं. यशस्वी जयस्वालनं ४५ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावांची खेळी उभारली. विराट कोहलीनं चार चौकारांसह नाबाद २९ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. तो विजय केवळ बांगलादेशवरचा नव्हता, तर वेळ आणि पावसावरही होता. त्यामुळं या विजयासाठी भारतीय संघाला शाबासकी देताना कसोटी दर्जाला साजेशी फलंदाजी आता लुप्त होत चाललीय का, याचाही विचार करायला हवा.


या बातमीसोबत आजच्या झीरो अवरमध्ये इथंच थांबूया. पण उद्या सात वाजून ५६ मिनिटांनी झीरो अवरमध्ये पुन्हा भेटूया. पण बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहात राहा एबीपी माझा.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour IND vs BAN Test Match : कानपूर कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने मालिका जिंकली

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.