Zero Hour Full : लोकसभा निवडणुकीत मुंबईचा किंग कोण ठरेल? Uddhav Thackeray vs Narendra Modi

मुंबई: नरेंद्र मोदींची पंतप्रधान म्हणून मुंबईतील शेवटची सभा असून त्यानंतर मोदी हे पंतप्रधान राहणार नाहीत, 4 जून नंतर ते झोळी घेऊन निघून जातील, नंतर तुमचं काय होणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना विचारला आहे. गेल्या दहा वर्षांत मोदींनी झोप न घेतल्याने त्यांचा मेंदू आता क्षीण झाला आहे, भाजपने या काळात नवीन नेतृत्व तयार केलं नाही असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी 'एबीपी माझा'शी खास संवाद साधताना भाजपवर टीका केली.
भाजपसोबत असणारे सगळेच हिंदुत्ववादी आहेत का?
उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेनेने हिंदुत्व सोडले असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपसोबत असलेले इतर नेते, नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे हिंदुत्ववादी आहेत का याचं उत्तर भाजपने पहिला द्यावं. खोटं कोण बोलतंय हे जगाने पाहिलंय. 2019 साली मोदींनी म्हटलेलं की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते, सर्वांना घरं देणार. आता ही त्यांची जुमलेबाजी. त्यांना माझा जय भवानी हा शब्दही चालत नाही."
मोदींचं कॉन्ट्रक्ट आता संपलंय
देश आता मोदींच्या हातात द्यायचं कारण नाही, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलंय असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, आदर्श घोटाळा झाल्याचा आरो, इक्बाल मिर्ची आणि विमान घोटाळा असे अनेक आरोप कोण केलेले? मोदींनी आता त्यांनाच सोबत घेतलं आहे. मोदींच्या मेंदूला क्षीण आलेला आहे. 4 जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. मोदींना आता 75 वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यामुळे भाजपकडे दुसरा चेहरा नाही. गेल्या 10 वर्षात तर भाजपने नेतृत्व तयार केलं नाही. 400 पार म्हणत असाल तर तुम्ही इतर पक्ष का फोडताय?