✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full : मंत्रिमंडळ विस्तार, मविआ फुटणार? ते मोदींच्या कपूर कुटुंबासोबत गप्पा

abp majha web team  |  11 Dec 2024 10:01 PM (IST)
ABP News

मंडळी.... महाराष्ट्रातल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या सरकारमधल्या खातेवाटपाचा कार्यक्रम कधी होणार.... याचाच निकाल दिल्लीत लागू शकतो.. कारण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत डेरेदाखल झालेत.. पण या दिल्लीभेटीत माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यालोबत नाहीत. ते मुंबईमुक्कामी थांबलेत.. त्यामुळं साहजिकच राजकीय चर्चांना उधाण तर येणारच...
 
नव्या महायुती सरकारचा शपथविधी होऊन आता सहा दिवस झालेत.. अर्थात त्या सोहळ्यात फक्त एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय... कोणतंही खातेवाटप झालेलं नाहीय.. म्हणून विरोधक.. हे दिवसरात्र... खातेवाटपावरुन... महायुती सरकारला टार्गेट करतायत.. त्यातच आज दुपारी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस.. आणि संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार... दिल्लीत पोहोचले.. 
दुपारी एकनाथ शिंदेंही दिल्लीला जाणार अशा बातम्याही आल्या.. पण, त्यांनी मुंबईतच राहणं पसंत केलं..  आता दिल्लीत काय काय झालं.. हे आपण आजच्या झीरो अवरमध्ये पाहणार आहोतच..
 
पण, त्यासोबतच आपण महाविकास आघाडीत नेमकं काय काय सुरु आहे.. याचाही आढावा घेणार आहोत..


मंडळी, तुम्हाला आठवतंय का? विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.. तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती.. त्याच बैठकीत काही पराभूत उमेदवारांनी स्बवळावर लढावं अशी मागणी केल्याची बातमी होती.. इतकंच नाही तर जेव्हा ठाकरेंनी महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठीची बैठक आयोजित केली.. तिथंही काही नेत्यांचा सूर हा स्बवळाचाच होता..


बरं, हे सारं जरी असलं तरी महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून ठाकरेंची शिवसेना काम करत राहणार.. आणि निवडणुकाही लढणार... अशीच माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे... 


पण, मंडळी हे सगळं घडलं पंधरा दिवसांपूर्वी.. आणि हे सगळं मी आज का सांगतोय.. कारण त्याला पार्श्वभूमी आहे.. दिल्लीची... राष्ट्रीय राजकारणातल्या इंडिया आघाडीचं नेतृत्व बदलून ते ममता बॅनर्जींना द्यावं म्हणत शरद पवार, लालू प्रसाद यादवांपासून ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत अनेकांनी काँग्रेससमोर आव्हान उभं केलंय.. इतकंच नाही तर इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षानंही पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिलाय.. इतकंच नाही तर तिथं काँग्रेसनं उमेदवार दिले तरी त्यांच्याविरोधात लढण्याची तयारीही केलीय..
 
त्यामुळं जे पंजाबमध्ये झालं.. जे पश्चिम बंगालमध्ये झालं... तेच आता दिल्लीतही होईल का.. आणि या घटनेचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का? आणि झाला तर केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचा पॅटर्न... उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात राबवणार का? 


मंडळी, मविआतील याच संघर्षावर आहे आपला आजचा पहिला प्रश्न.. आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला..


दिवंगत चित्रपट निर्माते आणि अभिनेते राज कपूर म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका जमान्याचे जणू शोमन. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज त्याच राज कपूर यांच्या आठवणींमध्ये रमून गेल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होतं राज कपूर यांची नातवंडं म्हणजे रणबीर कपूर, करिना कपूर, करिश्मा कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्यासह कपूर कुटुंबातल्या अनेक सदस्यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेल्या कपूर कुटुंबातल्या अन्य सदस्यांमध्ये नीतू कपूर, आलिया भट, सैफ अली खान यांचाही समावेश होता. कपूर कुटुंबाच्या सदस्यांनी या भेटीत पंतप्रधानांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांना आपल्या मनातील प्रश्नही विचारले.


या साऱ्या मंडळींमध्ये रंगलेल्या गप्पा पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की या भेटीचं निमित्त काय होतं? तर मंडळी, दिवंगत चित्रपट निर्माते आणि अभिनेते राज कपूर यांची जन्मशताब्दी येत्या १४ डिसेंबरला देशभर साजरी करण्यात येत आहे. आणि त्यानिमित्त १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत राज कपूर यांच्या चित्रपटांच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव पीव्हीआर आयनॉक्स साखळीतल्या चित्रपटगृहांमध्ये संपन्न होणार असून, त्यासाठी कपूर कुटुंबीयांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. 


यावेळी करिना कपूरनं आपल्या तैमूर आणि जहांगीर या मुलांसाठी पंतप्रधान मोदींकडून खास संदेशही लिहून घेतला. 


राज कपूर यांच्या चाहत्यांच्या आणि नव्या पिढीतल्या चित्रपटरसिकांच्या माहितीसाठी, आगामी महोत्सवात राज कपूर यांचे आग, आवारा, श्री ४२०, संगम आणि मेरा नाम जोकर आदी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.


या पार्श्वभूमीवर आपण पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबीयांमध्ये झालेला संवाद.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full : मंत्रिमंडळ विस्तार, मविआ फुटणार? ते मोदींच्या कपूर कुटुंबासोबत गप्पा

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.