✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज, वाचाळवीर मंत्र्यांना लगाम बसणार? ABP MAJHA

abp majha web team  |  25 Jul 2025 10:28 PM (IST)
ABP News

Zero Hour Full : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज, वाचाळवीर मंत्र्यांना लगाम बसणार? ABP MAJHA


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


आमदार, खासदार आणि एकूणच नेते मंडळींच्या नावाधी तुम्ही पाहिलं असेल विविध ज्या पत्रिका असतात, आमंत्रण असतात, त्यावर लिहिलेल असतं, नामदार, आदरणीय अशा उपाध्या लिहिलेल्या असतात. आमदारांचा, मंत्र्यांचा कोणत्याही कार्यक्रमात शासकीय प्रोटोकॉल असतो आणि मग तो कार्यक्रम सरकारी असो की खाजगी. सांगायचा मुद्दा असा की ही मंडळी लोकप्रतिनिधी किंवा म्हणायला जनसेवक असली तरी प्रत्यक्षात त्यांनाच आपल्या सामान्य लोकांना अधिकमान द्यावा लागतो. मग या लोकांकडून. वागण्याची सभ्यपणे बोलण्याची अपेक्षा आपण नाही का करायची आणि अपेक्षाच का? ही तर त्यांची जबाबदारीच आहे. मात्र गेल्या काही दिवसात महायुती सरकारच्या नेते, आमदार आणि अगदी मंत्र्यांनीही आपल्या वागण्या बोलण्याने महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आणि राज्याच्या राजकीय संस्कृतीला कमीपणा आणला. महायुतीतला मोठा पक्ष म्हणून भाजप आणि विधिमंडळाचे नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आपल्या या सहकार्यांच्या वागण्याची जबाबदारी येते. आतापर्यंत समज देणे, नाराजी व्यक्त करणे, फडणवीसांनी हे सगळे प्रकार करून. बघितले म्हणजे थोडक्यात कारवाई न करता एक सूचन केलं कारण अपेक्षा अशी की मंडळी सुधारतील मात्र यापुढेही सुरू असलेल्या या वाढत्या कारणमुळे वाढत्या अशा प्रकारांमुळे आता फडणवीस ऍक्शन मोडवर आल्याची चर्चा आहे. याची चुणूक आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या विधिमंडळातल्या दर्शनी भागा झालेल्या राड्यानंतर फडणवीसांनी सभागृहात केलेल्या भाषणात दिसली. लोकांना आमदार माजलेत असं वाटू लागले या स्पष्ट शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र त्यानंतर लगेच आपले शेती मंत्री, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच मोबाईलवरील पत्ते प्रकरण आणि त्याबद्दल आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेचे पदाधिकारी विजय कुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून झालेली मारहाण ही प्रकरण घडली. आधीच कृषी खात्याच्या कारभारावरून शेतकरी नाराज. कोकाडेनी यापूर्वी एक रुपया पीक विम्यावरून भिकाऱ्याशी तुलना केल्याच वक्तव्य लोकांच्या लक्षात आहे आणि कमी म्हणून की काय त्यांनी शेतकरी नव्हे तर शासन भिकारी आहे असं वक्तव्य केलं. दुसरीकडे आकाशवाणी कॅंटीन मारहाण फेम टिका. आणि हाच आहे आजचा झिरोवरचा मुद्दा आणि आज आहे झिरोवरचा सवाल तो मुद्दा आणि प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला पाहूयात आजचा प्रश्न ज्याबद्दल आम्हाला अपेक्षित आहेत तुम्हा लोकांच्या म्हणजेच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि मत. प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांच्या उघड नाराजीनंतर तरी महायुतीतील सर्वच राडेबाज वाचाळवीर मंत्री आमदारांना लगाम बसेल का? होय आणि नाही मध्ये आपण उत्तर देऊ शकता. एबीपी मादाच्या एक्स facebook, youtube आणि instagram या आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर हा प्रश्न पोस्ट केलेला आहे. त्याखालचा पर्याय आपण निवडू शकता आणि मत. तुमची इथे मांडू शकता, कमेंट्स देऊ शकता ज्या कमेंट्स आम्ही थोड्या वेळात दाखवू. पुन्हा एकदा आपल्या झिरोवरच्या स्टुडिओ मध्ये येऊयात. या पार्श्वभूमीवर मंत्री आमदारांच्या कोणत्या कृत्यामुळे सरकारवर टीका झाली पाहूया. कोकाट्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ, संजय गायकांचा आमदार निवासातला राडा, पैशाच्या बॅगस शिरसाटांचा व्हिडिओ, सावली बार प्रकरणी योगेश कदमांवर आरोप, त्यानंतर शंभूराज देसाई, अनिल. ना म्हणाले, बाहेर ये बघतो तुला असं कोण म्हणते गृहराज्यमंत्री, संजय गायकवाड बाहेर येऊन काय म्हणतायत तर मुष्टीयुद्ध खेळू हे कोण म्हणते आमदार, मंत्री, मान्यवर नेते, ज्यांची स्वतःची राजकीय कारकीर्द किमान दोन ते तीन दशकांची आहे, अशी मंडळी असं वागू लागली तर महाराष्ट्राच्या देदीपमान परंपरा लाभलेल्या आणि स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणांपासून, वसंत दादा पाटलांपासून, सुधाकरराव नायकांपासून, गोपीनाथ मुंडेंपासून अशा सर्वांपासून मनोहर जोशींपासून. अशा सर्वांपासून चालत आलेली ही विधिमंडळातली देदीप्यमान परंपरा तिच काय करायचा हा प्रश्न आणि या बाबतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त करताना काय म्हटल ते पाहूया. फडणवीस शिंदे दादांना काय म्हणाले? सूत्रांच्या माहितीनुसार कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल. कारवाई न केल्यास काहीही केलं तरी चालतं असा समज निर्माण होईल. काही निर्णय घ्यावेच लागतील. फडणविसांचे स्पष्ट संकेत. महायुती सरकार मधल्या आठ मंत्र्यांच्या विकेट लवकरच पडणार असल्याच भाकीत सामना या ठाकरेंच्या शिवसेनेच्या वृत्तपत्रातून करण्यात आला आणि त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या काही वादग्रस्त मंत्र्यांची नाव देण्यात आली. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज, वाचाळवीर मंत्र्यांना लगाम बसणार? ABP MAJHA

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.