✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Bhaskar Jadhav | कोकणात का पडतेय जातीय समीकरणांची गरज?

abp majha web team   |  12 Aug 2025 11:39 PM (IST)

नमस्कार, मी अमोल जोशी.
झीरो अवरमध्ये आपलं स्वागत. 
विषय आहे भास्कर जाधवांचा.
पण फक्त भास्कर जाधव यांच्यापुरता नाही.
विषय आहे त्यांनी ब्राम्हण समाजाबाबत केलेल्या विधानाचा.
पण फक्त त्या एका विधानापुरता नाही.
आणि
विषय आहे गुहागरमधील जातीय समीकरणं आणि त्यामागच्या राजकारणाचा...
पण फक्त गुहागरच्या राजकारणाचा नाही. 
तर झालं असं..
गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुहागर दौरा केला.
या दौऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर त्याच ठिकाणी भास्कर जाधवांनी पक्षाचा एक मेळावा घेतला.
या मेळाव्यात त्यांनी उपस्थितांना एक प्रश्न विचारला.
तो प्रश्न होता की तुम्हाला पुन्हा खोतकी हवीय का..
खोताच्या ओटीवर जाऊन बसायचंय का..
आता खोतकी हा विषय काही कुठल्या एका विशिष्ट समाजापुरता नाही.
वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या समाजाकडे खोतकी असते.
पण खोतकीबाबत बोलताना भास्कर जाधवांनी काही ब्राम्हण नेत्यांची नावं घेतली आणि वादाला सुरुवात झाली.
याला ब्राम्हण साहाय्यक संघानं आक्षेप घेत त्यांना पत्र दिलं.
त्यानंतर काल मुंबईतील शिवसेना भवनात आणखी एक मेळावा झाला. 
त्यात ब्राम्हण समाज पाताळयंत्री असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आणि वाद अधिकच भडकला. 
त्यानंतर ब्राम्हण समाजाकडून भास्कर जाधवांवर टीका सुरु झाली.
तर आपल्या भाषणाचा रोख हा गुहागरमधील बहुसंख्य ब्राम्हणांवरच होता, असं ठासून सांगत भास्कर जाधवांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचं सांगितलं. 
गुहागरमधील कुणबी समाजाचा असणारा प्रभाव आणि भास्कर जाधवांचे कोकणातले सध्याचे प्रतिस्पर्धी, मग ते विनय नातू असोत किंवा उदय सामंत यांना जोडून हे विधान पाहिलं जाऊ लागलं. 
या निमित्तानं महाराष्ट्रात वारंवार उद्भवणारे जातीय वाद, मतांच्या गणितांसाठी केला जाणारा जातींचा वापर अशा मुद्द्यांवर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत.
पण त्यापूर्वी पाहूया भास्कर जाधव आज नेमकं काय म्हणाले. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Bhaskar Jadhav | कोकणात का पडतेय जातीय समीकरणांची गरज?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.