Reservation Row: 'Wadettiwar समाजाची दिशाभूल करत आहेत, आमचं आरक्षण कुठे संपलं?', Babanrao Taywade यांचा सवाल
abp majha web team | 10 Oct 2025 08:54 PM (IST)
ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चात ओबीसी नेत्यांमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. या मोर्चाचे आयोजन करणारे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी गंभीर आरोप केले. ‘जे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत ते सर्वच ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत,’ असा थेट आरोप तायवाडेंनी केला. मोर्चा यशस्वी ठरला असला तरी, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जीआर विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याने ते या मोर्चात दिसले नाहीत. तर दुसरीकडे, बबनराव तायवाडे यांच्या ओबीसी महासंघानेही मोर्चाकडे पाठ फिरवली. वडेट्टीवार हे 'आपलं आरक्षण संपलं' असा चुकीचा संदेश देऊन समाजाची दिशाभूल करत असल्याचं तायवाडेंचं म्हणणं आहे. त्यामुळे आपली संघटना या मोर्चात सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.