✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

abp majha web team  |  07 Jul 2026 10:38 PM (IST)
ABP News

भारतात महिलांसाठी ट्रेनचा प्रवास सुरक्षित आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही होय असं देणार असाल तर शनिवारची बातमी तुमच्या कानावर आलीय का? ही बातमी तुम्ही जर ऐकलीत ना, तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. तुमचंही रक्त उसळायला लागेल. तुम्हालाही प्रश्न पडावा की, हा सारा निंदनीय प्रकार घडत असताना भारतीय रेल्वेचे तिकीट तपासनीस किंवा रेल्वे पोलीस होते कुठे? लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये महिलांचा विनयभंग होत असताना त्या नराधमांना रोखणारं कुणीच तिथं नव्हतं का? गर्दीचा फायदा घेऊन आरक्षित डब्यातून प्रवास करणारे हे नराधम आणि त्यांच्याकडे डोळेझाक करणारी भारतीय रेल्वे यांचा वेळीच पर्दाफाश करण्याची गरज आहे. आपल्या नागपुरातल्या या महिलांसाठी शनिवार, तीन जुलैची मध्यरात्र खूपच भयंकर ठरली. हातात आरक्षित डब्याचं तिकीट आणि सोबतीला कुटुंबीय असतानाही, केवळ महिला म्हणून त्यांच्यासोबत घृणास्पद प्रकार घडणार असतील, तर खरंच आपण माणसांच्या जगात राहतो का, हा प्रश्न भारतीय रेल्वेला आणि केंद्र सरकारला विचारावासा वाटतो. हे सारं ऐकल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असावा, की, नेमकं असं घडलं तरी काय? तर ऐका. नागपूरच्या काही महिला आपापल्या कुटुंबीयांसोबत बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पर्यटन आणि देवदर्शनासाठी गेल्या होत्या. या महिलांचं दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसनं परतीचं तिकीट आरक्षित होतं. बिहारच्या दानापूरमधून निघालेली ही ट्रेन नागपूरच्या महिलांना उत्तर प्रदेशातल्या वाराणसीतून पकडायची होती. पण प्रत्यक्षात तो डबा समोर येताच त्या महिलांना मोठा धक्का बसला. नेमक्या ७२ जणांच्या त्या आरक्षित डब्यात तब्बल चारशेहून अधिक लोकांचा जमाव घुसला होता. त्या जमावापैकी किती जणांनी तिकीटं काढली होती, हा प्रश्नय? नागपूरच्या त्या महिला आपल्या कुटुंबियांसह कशाबशा ट्रेनमध्ये चढल्या खऱ्या, पण तिथून सुरू झाला विनयभंग, छेडछाड आणि अश्लील शेरेबाजीचा किळसवाणा अनुभव. ट्रेनच्या दारातून आपल्या आरक्षित आसनापर्यंत जाताना, त्या महिलांना धक्के, अचकट विचकट शेरेबाजी, विनाकारण होणारे स्पर्श या घाणेरड्या प्रकारांना त्यांना सामोरं जावं लागलं. जमावातले ते नराधम कोणालाही ऐकत नव्हते, जुमानत नव्हते. त्यामुळं महिलांनी रेल्वेच्या १३९ या क्रमांकासह एक्स हँडलवर तक्रार केली. पण धक्कादायक बाब म्हणजे त्याचाही काही उपयोग झाला नाही. नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या झीरो अवर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.