Fadnavis VS Yashomati : फडणवीसांच्या आरोपांवर यशोमती ठाकूरांचा पलटवार, दंगलीनंतर राजकीय धग कायम...
abp majha web team | 21 Nov 2021 11:48 PM (IST)

माजी मंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत सरचिटणीसपदी बढती देत राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडल्यानंतर विनोद तावडेंना कार्यकारिणीत महत्वाचं स्थान दिलं आहे. याआधी प्रमोद महाजन यांनी केंद्रात दीर्घकाळ सरचिटणीसपद भूषवलं होतं. काही दिवसांपूर्वी राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेनंतर हिंसाचार घडला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीतील हिंसाचाराचा आढावा घेतला. या दौऱ्यात फडणवीस नेमकं काय म्हणाले? आणि त्यानंतर राजकारण कसं तापलं?