Majha Vishesh | जलयुक्त शिवारमध्ये भ्रष्टाचार कुणी केला? ग्रामीण भाग बेजार, मालामाल कंत्राटदार!
एबीपी माझा वेब टीम | 15 Oct 2020 07:04 PM (IST)
जलयुक्त शिवार योजनेवर 9 हजार 634 कोटी रुपये खर्च करुनही पाण्याची गरज भागवण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचा गंभीर ठपका कॅगने ठेवला होता. हे अभियान राबवलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात अपयश आल्याचा निष्कर्षही काढण्यात आला आहे. हे अभियान राबवलेल्या गावात पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकर्स सुरु असल्याचे कॅगने निदर्शनास आणून दिले आहे.