Vaccination : संपूर्ण देशाचं लसीकरण कधी पूर्ण होणार? लसीकरणावरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली | 29 May 2021 12:06 AM (IST)

नवी दिल्ली : भारत व्हॅक्सिन कॅपिटल असूनही या देशातील लसी पंतप्रधान मोदींनी निर्यात केल्या आणि इथल्या लोकांना वाऱ्यावर सोडलं. आता पंतप्रधानांनी व्हॅक्सिन स्ट्रॅटेजी बनवून कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढवावा अन्यथा देशात तिसरी, चौथी नव्हे तर कोरोनाच्या अनेक लाटा येतील असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार परिषदेला संबोधित करत होते.