विरारच्या रुग्णालयात अग्नितांडव, 14 रुग्णांचा होरपळून मृत्यू, केवळ चौकशा सुरू, मात्र सुधारणा कधी?
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2021 11:20 PM (IST)

मुंबई : राज्यात एकीकडे अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असताना बुधवारी नाशिकमध्ये डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पुढाकार घेतला असून एक सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर राज्य सरकारने आपले मत मांडावे असेही निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.