UP Elections : पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशआत होणार मतदान, जनतेचा कौल कुणाला? Special Report
abp majha web team | 05 Feb 2022 11:06 PM (IST)

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्याचं मतदान होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत.. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवलाय. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशआत मतदान होणार आहे. इथलं जातीय समीकरण साधणं सगळ्याच पक्षांसाठी मोठं आव्हान आहे. जाट, ठाकूर, गुर्जर आणि मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं पश्चिम उत्तर प्रदेशात मोठं यश मिळवलं होतं. पण, यावेळी त्यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. शिवाय गुर्जर समाजात काहीशी नाराजी आहे. हीच नाराजी दूर करण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. पाहुयात गुर्जर तरुणांच्या नेमक्या मागण्या काय आहेत.