Uddhav Thackeray Mistake Special Report: मविआच्या 'त्या' दोन चुका, शिंदे गटाच्या पथ्यावर
abp majha web team | 21 Jul 2022 11:55 PM (IST)

शिवसेने सारख्या पक्षाचे राजकारण भावनिकतेवर चालते. शरद पवार हे राजकीय कुरघोडीवर विश्वास ठेवतात. पवारांनीच उध्दव ठाकरेंना बहुमत चाचणाशिवाय राजिनामा देवू नये अशी सुचना केली होती. तसे उध्दव ठाकरेंनी केले नाही. तोच मुद्दा शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर मोठी चुक ठरताना दिसतो आहे. त्याआधी नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा सहकार्यांशी चर्चा न करताच दिलेला राजिनामाही भाजपा-शिंदे सरकारच्या पथ्यावर पडला आहे.