Special Report : यंदा व्याघ्र गणना 'पेपरलेस' ; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचा निर्णय ABP Majha
abp majha web team | 16 Oct 2021 08:41 PM (IST)

भारतातील वाघांची प्र-गणना दर चार वर्षांनी होत असते, यापूर्वी झालेल्या प्र-गनणेत भारतात तब्बल २९६७ वाघांची नोंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चार वर्षांनी भारतातील पट्टेदार वाघांसह महत्वाच्या वन्यजीवांच्या प्र-गणनेला लवकरच सुरुवात होणार आहे.. मात्र यावेळी पारंपरिक पद्धतीला फाटा देत व्याघ्र प्रगणनेत 'एम स्त्राईप इकॉलॉजिक्स अँप' चा वापर करण्याचा निर्णय भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने घेतलेला आहे.. कशी होणार ही डिजिटल गणना पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून...