उष्णतेची लाट लावणार वाट! अनेक जिल्ह्यात पारा 42 अशांवर, राज्यात पुढचे काही दिवस तापमान वाढणार
सारंग पांडे, एबीपी माझा | 07 Apr 2021 12:54 AM (IST)
राज्यात पुढील काही दिवस आरोग्य यंत्रणेचा कस लागणार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. याला कारण राज्यातील उन्हाचा पारा वाढत आहे. हवामान खात्याने या बाबतचा इशारा दिला आहे. राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे तापमानाचा पारा देखील वाढतो आहे. राजस्थान आणि गुजरात या भागातून अतिशय गरम वाऱ्याचे प्रवाह मध्य भारताकडे प्रवाहित होत आहेत. जवळजवळ 100 किलोमीटर रुंदीचा हा वाऱ्याचा प्रवाह जळगाव ते चंद्रपूर असा असणार आहे. यामुळे या पट्ट्यात येणाऱ्या भागात प्रचंड तापमान वाढ होणार आहे.