Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या पराक्रमाची चर्चा अजूनही सुरू आहे मात्र बहुमताचा आकडा नसल्यामुळे ते काही सरकार स्थापन करू शकलेले नाही आहेत खरं तर आज सकाळीच त्यांचा शपथविधी होणार होता मात्र बहुमत दाखवा आणि मगच शपथविधी अशी भूमिका राज्यपालांनी घेतली आणि त्यामुळे तमिळनाडूमध्ये नवीन राजकीय पेच निर्माण झालाय काय नेमकं नेमकं घडतंय तमिळनाडूमध्ये बघूया सुपरस्टार ते सुपर लीडर असा प्रवास केलेल्या थलपती विजय यांचा शपथविधी घटनात्मक वादात अडकलाय खरं तर गुरुवारी सकाळी 10 वाजता हा सोहळा होणार होता तशी तयारी ही सुरू होती मात्र राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेशा आमदारांचा पाठिंबा नसल्याचं सांगत विजय यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिलं नाही 234 सदस्य असलेल्या तमिळनाडू विधानसभेत बहुमताचा आकडा हा 118 आहे विजय यांच्या तामिळ वेत्री कळघम पक्षाचे सर्वाधिक 108 आमदार निवडून आलेत तर पाच आमदार असलेल्या काँग्रेसने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलाय त्यामुळे विजय यांच्याकडे 112 आमदारांचा संख्याबळ असलं तरी आणखी सहा मतांची जुळवाजुळव त्यांना करावी लागणार आहे 112 आमदारांच्या पाठिंब्यासह राज्यपालांची भेट घेत विजय यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला परंतु शपथविधीसह बहुमत सिद्ध करणं देखील आवश्यक असल्याचं सांगत राज्यपालांनी अजूनपर्यंत विजय यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिलेलं नाहीये यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला असून राज्यपालांच्या भूमिकेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे संवैधानिक परंपरा संवैधानिक कानुन संवैधानिक अ लिखित जो पक्ष है संविधान के पुराने प्रेसिडेंट्स संविधान की संस्कृति इन सब के अंतर्गत तमिळनाड की मान्य राज्यपाल बाध्य है की सबसे बड़ी पार्टी को सरकार बनाने के लिए अ तुरंत निमंत्रण दे ये हम सब जानते है की यही स्थापित संवैधानिक पोजीशन है विजय यांना सत्ता स्थापनेपासून राज्यपाल रोखत असल्याचा आरोप करत काँग्रेसने शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली विशेष म्हणजे विजय यांनी विनंती करूनही अद्याप जाहीर पाठिंबा देणं टाळणारे डावे पक्षही राज्यपालांवर टीका करतायत तामिळ वेत्री कळघम अँड इट्स लीडर मिस्टर विजय हु हाव बीन वोटेड एस द सिंगल लार्जेस्ट पार्टी बाय पॉप्युलर वर्डिक्ट वाय ही इज नॉट बीइंग कॉल्ड अप कोर्ट टू अ स्टेक हिज क्लेम अँड टेक ओथ देन रीज़नेबल टाइम कैन बी गिवन टू प्रूव्ह हिज मेजॉरिटी ऑन द फ्लोर ऑफ द हाउस माकपाने पाठिंब्याबाबत अद्याप भूमिका जाहीर केली नसताना भारतीय कम्युनिस्ट पार्टीने शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली अभिनेता ते नेता असा प्रवास करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कमल हसन यांनीही या वादात उडी घेतली आहे विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित न करणं हे तमिळनाडूच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करण्यासारखं आहे 233 निवडून आलेले सदस्य अद्याप आपल्या पदाची शपथ घेऊ शकलेले नाहीयेत हा राज्याचा अपमान आहे हा लोकशाहीलाच धक्का आहे अशी एक्स पोस्ट हसन यांनी केली आहे एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न काँग्रेसकडून सुरू असला तरी त्याला अद्याप यश आलेलं नाहीये त्याचवेळी एनडीएचा तमिळनाडू तला मोठा घटक पक्ष असलेल्या एआयडीएमके मध्ये विजय यांच्या पाठिंब्यावरून दोन मतप्रवाह आहेत पक्षाच्या 47 आमदारांपैकी 28 जणांना पुदुचेरीला एका रिसॉर्ट मध्ये नेण्यात आले विजय यांना पाठिंब्यासाठी आग्रही असलेले माजी मंत्री सी व्ही शणमुगम यांनीही जमवाजमव केली आहे ओएस मणियन थलावी सुंदरम हे ज्येष्ठ नेतेही त्यांच्यासोबत आहेत तर पक्षाचे उपमहासचिव केपी मुनुसामी यांनी मात्र पाठिंब्याचा स्पष्ट शब्दात इनकार केलाय त्यामुळे विजय यांना पाठिंब्यावरून एआयडीएमके पुन्हा एकदा फुटण्याची शक्यताही वर्तवली जातीये या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर थलपती विजय यांनी गुरुवारी पुन्हा राजभवन गाठलं आणि सत्ता स्थापनेचा दावा केला राज्यपाल आर्लेकर यांनीही आपल्या भूमिकेवर ठांब राहत विजय यांना कागदोपत्री बहुमत दाखवायला सांगितलं विरोधक म्हणतात तसं सर्वात मोठ्या पक्षाला राज्यपालांनी आमंत्रित करावं लागतं की स्थिर सरकारच्या दृष्टीने राज्यपालांची बहुमताची खातरजमा करणं योग्य आहे यावर कायदेतज्ञ काय सांगतात ते ऐकूया विधानमंडळाच्या बाहेर अशा प्रकारची एखादी आघाडी युती ही बनण्याची शक्यता असू शकते परंतु असं जर नाही झालं तर मात्र गव्हर्नर साहेबांना त्या ठिकाणी आपले अधिकार वापरावे लागू शकतात आणि त्यांनी जर अधिकार वापरले तर निश्चितच या ठिकाणी राष्ट्रपती राजवटीपर्यंत सुद्धा आदरणीय गव्हर्नर साहेब जाऊ शकतात घटनेमध्ये जे घटनेमध्ये जे आर्टिकल 164 एक आहे त्याप्रमाणे गव्हर्नरला अधिकार आहेत गव्हर्मेंट फॉर्म करण्याचे तर जी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे तिला इन्व्हिटेशन दिलं गेलं पाहिजे हे एक अ एक सरळ एक एक अ प्रोसिजर आहे आणि त्या सिंगल लार्जेस्ट पार्टीला इन्व्हिटेशन दिल्यानंतर त्यांना फ्लोर टेस्ट पास करण्यासाठी 30 दिवसाचा वेळ असतो तर त्या 30 दिवसांमध्ये त्यांनी ती असेंबली मध्ये अ फ्लोर टेस्ट पास केली गेली पाहिजे तर गव्हर्नरने जी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे तिला इन्व्हिटेशन देऊन गव्हर्मेंट गव्हर्मेंट फॉर्म करण्यासाठी सांगितलं पाहिजे किंवा एक इन्व्हिटेशन दिलं पाहिजे तमिळनाडूतल्या या घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाची आठवण झाली नाही तरच नवल पण भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून त्यांनी अत्यंत आर्मुठे भूमिका घेतलेली आहे मोठा पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्ही केला सत्ता स्थापनेचा आमंत्रण दिलं नाही हे लक्षात घ्या हे घटनात्मक दोष अत्यंत चुकीचा आहे भारतीय जनता पक्षाने देशभर सगळे कोशारीच नेमलेले आहेत ना कोणी धोतऱ्यामध्ये आहेत कोणी सुटाबुटातले आहेत 2014 मध्ये 122 आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता निवडणुकीपूर्वी युती आघाडी तुटल्यामुळे चारही मोठे पक्ष स्वबळावर लढले त्यावेळी पूर्ण निकाल लागण्याच्या आधीच शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला परिणामी तोपर्यंत युतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी झाली राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिलं आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले सुरुवातीला विरोधी पक्षात बसलेली उद्धव ठाकरेंची एकत्र शिवसेना नंतर सत्तेतही सहभागी झाली हा ड्रामा फिका पडेल असं राजकारण राज्याने पाहिलं ते 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर युतीत लढलेल्या भाजप शिवसेनेला विधानसभेत स्पष्ट बहुमत होतं मात्र मुख्यमंत्री पदाचा आश्वासन दिल्याचं सांगत शिवसेना युतीतून बाहेर पडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीसह सत्ता स्थापनेच्या खटपटी सुरू केल्या एक दिवस सकाळी अचानक राज्यपाल भगतसिंह कोशारींनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली मात्र दोनच दिवसात परिस्थिती बदलली सर्वोच्च न्यायालयाने तातडीने बहुमत सिद्ध करायला सांगितलं आणि त्यानंतर अजित दादा स्वगृही परतले अखेर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले विजय यांनी शपथविधीसाठी काढलेला सात तारखेचा मुहूर्त गोट सिनेमातल्या त्यांच्या कारच्या नंबर प्लेटमुळे चर्चेत आला होता मात्र राज्यपाल मागे हटायला अजिबात तयार नसल्यामुळे हा मुहूर्त चुकल्या आता विजय यांच्यासमोर तीन पर्याय आहेत एक तर मुस्लिम लीग आणि डाव्या पक्षांची समजूत घालून त्यांच्याकडून पाठिंब्याचे पत्र मिळवणं एआयडीएमके मध्ये पाठिंब्यासाठी उत्सुक नसलेल्यांची मनधरणी करणं किंवा शेवटचा पर्याय म्हणजे जयललिता यांच्या पक्षात आणखी एक मोठी फूट पाडून सत्ता सोपान चढणं आता यातला कोणता पर्याय विजय यांना तमिळनाडूचा थलपती करतो ते पाहायचंय