Palghar Child Death Special Report : अनास्थेचा कलंक आश्वासनातले 'पूल' प्रत्यक्षात कधी?
abp majha web team | 13 Jul 2023 11:38 PM (IST)

सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाचा तिढा, आमदारांची नाराजी, कलंक या वादाला जणू ऊत आलाय. गेले १२ दिवस आपण हेच पाहतोय.. मात्र महाराष्ट्राला लागलेले खरे कलंक पाहायचे तर राज्यातील अनास्थेवर एक नजर टाकावी लागेल.. पालघरचंच उदाहरण घ्या... पुरात अडकलेल्या दोन महिन्यांच्या चिमूरडीपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचू शकली नाही आणि या चिमूरडीचा मृत्यू झाला... विरोधक असो की सत्ताधारी सगळेच सध्या राजकारणात गुंग आहेत..आणि महाराष्ट्राचं भविष्य मात्र मुलभूत सुविधांअभावी तडफडून जीव सोडतंय..