Special Report Shinde vs Thackeray: औरंगाबाद उस्मानाबादचं पुन्हा बारसं ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Jul 2022 11:27 PM (IST)
ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिलीय. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असं नामांतर करण्याच्या निर्णयाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली होती. तसंच नवी मुंबई विमानतळाचं दि.बा.पाटील असं नामकरण करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतला होता. मात्र शिंदे सरकारने या तिन्ही निर्णयांना स्थगिती दिलीय. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत ही स्थगिती देण्यात आलीय. याआधी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही हाच आक्षेप घेतला होता. उद्या शिंदे सरकार तिन्ही निर्णयांवर शिक्कामोर्तब करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत..