Rane VS Rane : कणकवलीतलं राजकीय महाभारत! कोण कौरव, कोण पांडव? Special Report
Rane VS Rane : कणकवलीतलं राजकीय महाभारत! कोण कौरव, कोण पांडव? Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
जेव्हा जेव्हा एकाच कुटुंबातल्या दोन व्यक्ती एकमेकां विरोधात लढण्यासाठी उभ्या राहतात तेव्हा तेव्हा महाभारताचे संदर्भ दिले जातात. लढाईमध्ये जेव्हा प्रतिस्पर्धी हा रक्ताच्या नात्यातला असतो तेव्हाही महाभारत आठवत जेव्हा इच्छा नसतानाही भावंडांसोबत लढाव लागतं तेव्हाही महाभारतच आठवत. असच राजकीय महाभारत सध्या सुरू झाले तळ कोकणात. नारायण राण्यांचे दोन पुत्र नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे टाकलेत. बिगुलही वाजले आणि लढाईला सुरुवात. ही निवडणूक आहे कणकवली नगरपंचायतीची, एका बाजूला आहे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तर त्यांच्या समोर उभी ठाकली आहे शिंदे सेना, ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, एकमेकांसाठी एरवी कौरव असणारे सोबत तर एरवी एकत्र असणारे राजकीय. पांडव विरोधात असं काहीस चित्र यामुळे निर्माण झाले. आपल्या भाऊबंदांसोबत कसं लढायचं हा पेस मात्र इथे नाही. उलट आपल्याला एकमेकां विरुद्ध का लढाव लागतय याच उत्तर स्वतः राणे बंधूत सर्वांना देत आहे. निर्णय तो जिल्ह्यातून झालेला नाही. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. हा निर्णय जो माहिती तोडण्याचा झाला तो बाहेरून झालेला आहे. आणि मी आमचं तुम्हाला सुरुवातीच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेल आहे. नात नात असतं. अशा कुठल्या. साहेबांना सांगून हा डिसिजन घेतलेला आहे म्हणून राणे साहेब हे बीजेपी मध्येच आहेत साहेब बोलले आता जास्त वेळ थांबू नका तुम्ही तुमचा निर्णय घ्या. तर राणेच्या सल्ल्यान त्यांचे दोन सुपुत्र आता लढाईसाठी सज्ज झालेत. प्रत्यक्ष महाभारतात कौरव पांडवांनीही दाखवला नसेल इतका समजूददारपणा सध्या राणे बंधूंच्या तोंडून ऐकायला मिळतोय. आपला भाऊ फक्त त्याचं कर्तव्य पार पाडतोय याची जाणीव राणेबंधूंना आहे. कोणी प्रचार करावा नाही हा कंप्लीटली त्यांचा विषय. आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत. अगर शिवसेना शिंदे गटानी त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरालाच लागेल राणे साहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला पक्षा 100% आम्ही त्यांना न्याय देतो आज मी भारतीय जनता पक्षामध्ये राणे साहेब आहेत निलेशजी शिवसेनेमध्ये 100% शिवसेना न्याय देतात ना नितेश राणे म्हणतात त्याप्रमाणे पक्षाला न्याय देण्यासाठी सत्तेमध्ये आम्ही केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे, त्याचबरोबर जिल्ह्याच्या आर्थिक दाव्या पण पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असल्यामुळे सावंतवाडी सावंतवाडीचा विकास आम्ही सक्षम पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या हक्काचे पैसे जे मला मिळतात ते मी माझ्या मतदार संघामध्ये शहरामध्ये वापरत असतो आणि हे सूत्र पूर्वीपासून आहे राज्य शासनाच त्याच्यामुळे कोणी पैसे दिले. आता या महाभारतात कौरव कोण आणि पांडव कोण हे ठरवण्याचे काम मतदार करतीलच मात्र नगरपंचायतीच हे महाभारत संपल्यानंतर पुन्हा एकदा हेच कौरव पांडव महायुतीच्या इंद्रप्रस्थात एकत्र यायला सज्ज होणार आहेत तोपर्यंत मात्र प्रचाराचे टीकेचे आणि आश्वासनांचे दशावतार जोरदार रंगणार एवढं मात्र नक्की
All Shows
































