Rajyasabha candidate Report : नातवाचं ठरलं, आजोबांचं अडल? ठाकरेंनी दावा सोडला असेल तर कारण काय?
Rajyasabha candidate Report : नातवाचं ठरलं, आजोबांचं अडल? ठाकरेंनी दावा सोडला असेल तर कारण काय?
नगरपालिका... महानगर पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी शांत झाल्यानंतर... या कार्यकर्त्यांच्या निवडणुका सरल्यानंतर आता राज्यात वारे वाहतायत ते 'नेत्यांच्या निवडणुकां'चे... राज्याच्या विधानसभेचं संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यसभा निवडणुकांची घोषणा झालीये... तर मे महिन्यात विधान परिषदेची निवडणूकही होईल... महायुतीकडे असलेल्या प्रचंड संख्याबळामुळे तिथं फारशी ओढाताण नसली, तरी आधीच कमकुवत झालेल्या महाविकास आघाडीसाठी या निवडणुका तारेवरची कसरत ठरणार आहेत... राज्यसभा निवडणुकीच्या राजकारणाची ही स्पेशल इन्साईड स्टोरी...
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'सत्ते पे सत्ता'चा खेळ रंगलाय...
१६ मार्चला होऊ घातलेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून सात जण राज्यसभेवर जातील...
आता 'ते' सात जण कोण असणार, यावर राजकीय वर्तुळात गरमागरम चर्चा होतेय...
विधानसभेतल्या संख्याबळानुसार महायुतीचे सहा जण निवडून येणार, हे नक्की आहे...
मात्र महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांची बेरीज केल्यानंतरही त्यांचा एकच खासदार निवडून येणारे...
त्यामुळे त्यामुळे शरद पवार, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी आणि रजनी पाटील या चौघांच्या जागी...
आता कोणत्या पक्षाच्या कुणाची वर्णी लागणार, यावरून महाविकास आघाडीत 'तिन तिघाडा' झालाय...
ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव पुढे करून उदारपणा दाखवला खरा...
All Shows


































