Palghar Dahanu : हंडाभर पाण्यासाठी रात्र जागवायची? कुठे आहेत आमदार आणि खासदार? Special Report
abp majha web team | 13 May 2022 08:13 AM (IST)

पालघर जिल्हा प्रशासनासाठी टँकरमुक्त असलेल्या डहाणू तालुक्यातील सायवन भावरपाडातील ग्रामस्थांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. डहाणू तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता नसल्याच प्रशासनाकडून सांगण्यात येत असल तरी नागरिकांना पाण्यासाठी रात्रभर विहिरी सभोवताली रांगेत उभं राहावं लागतंय.