Pahalgam Tourism : पहलगाम हल्ल्यानंतर काय आहे काश्मीरमधली परिस्थिती? Special Report

Pahalgam Tourism : पहलगाम हल्ल्यानंतर काय आहे काश्मीरमधली परिस्थिती? Special Report
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला आता दीड महिना होत आलाय. पण या हल्ल्यामुळे पहलगाम आणि एकूणच काश्मीरच्या पर्यटनाला मोठा धक्का बसला. पण इथलं प्रशासन आणि व्यापारी, व्यावसायिक पर्यटकांची पावलं पुन्हा काश्मीरकडे वळावीत यासाठी प्रयत्न करतायत. काश्मीरमधली सध्याची परिस्थिती कशी आहे? इथलं पर्यटन पुन्हा बहरण्यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाकडून काय तयारी सुरु आहे? आणि आगामी अमरनाथ यात्रेच्या निमित्तानं पहलगाम आणि एकूणच काश्मीरमधल्या पर्यटनाला चालना मिळणार का? पाहूयात आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी या सगळ्याचा घेतलेला हा आढावा...
मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या
पहलगामच्या याच बैसरन व्हॅलीत
दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला...
२२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या त्या भ्याड हल्ल्याच्या त्या जखमा अजूनही ताज्या आहेत...
पण हा हल्ला झाला आणि कलम ३७० हटवल्यानंतर
बहरलेल्या काश्मीरमधल्या पर्यटनाला पुन्हा खीळ बसली...
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी मान्य केलंय
की लोकांच्या मनात भीती आहे
पण सरकारकडून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे
शर्तीचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलंय...
इथल्या सरकारनं दहशतवादी हल्ल्यात
मृत्युमुखी पडलेल्यांचं एक स्मारक बांधण्याचाही निर्णय घेतलाय....
बाईट - ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू काश्मीर
((Feed : R Pahalgam Omar Abdullah TT))
काश्मीरच पर्यटन पुन्हा सुरू व्हावं
यासाठी इथले स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिकही प्रयत्न करतायत...
पण नेहमी गजबजलेल्या जम्मूतल्या लाल चौकातील मार्केटमध्ये शुकशुकाट आहे...
रिकामी दुकानं...
प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या रिक्षा...
गेल्या महिन्याभरात काश्मीरमध्ये हेच चित्र दिसतंय...
हल्ल्यानंतर काश्मीरमधलं तब्बल ९० टक्के बुकिंग रद्द झालंय....
आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी तर २०२६ पर्यंतच्या बुकिंग रद्द केल्याची ही माहिती आहे...
दरम्यान समानाधानाची एक बाब म्हणजे
अमरनाथ यात्रा लवकरच सुरु होणार आहे...
जिथे हल्ला झाला ते पहलगाम म्हणजे या यात्रेचा बेस कॅम्प
आतापर्यंत जवळपास ४ लाख भाविकांनी
अमरनाथ यात्रेचं बुकिंग केलंय...
त्यामुळे या यात्रेच्या निमित्तानं पर्यटकांचा काश्मीरशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडला जाईल हीच अपेक्षा...