Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
जे पद अजित पवारांनी आपल्या आयुष्यात सहा वेळा भूषवलं, त्याच पदाचा कार्यभार आता सुनेत्रा पवारांनी हाती घेतलाय...उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांनी आज त्याची प्रत्यक्ष सूत्रं हातात घेतली...दादांच्या राजकीय वारसदार म्हणून सुनेत्रा पवारांचा पहिला दिवस जसा जबाबदारीची जाणीव करून देणारा होता, तसाच तो भावनिकही होता...सक्रिय राजकारणातल्या आव्हानांना तोंड देत अजितदादांचा वारसा सुनेत्रा पवारांना पुढे न्यायचा आहे...पाहुयात आज दिवसभर नेमकं काय झालं ते...
एकीकडे कर्तव्य पार पाडण्याचा निग्रह...
आणि दुसरीकडे मनात दाटलेलं आठवणींचं काहूर...
ज्या खुर्चीवर बसून अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाचा कारभार चालवायचे...
त्याच खुर्चीवर बसताना सुनेत्रा पवारांच्या भावना दाटून आल्या...
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार आज पहिल्यांदाच मंत्रालयात आल्या...
आधी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला हात जोडून नमस्कार केला...
त्या खुर्चीवर स्थानापन्न झाल्या...
पदभार हाती घेताच सुनेत्रा पवार पहिल्यांदाच मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर झाल्या...
अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती...
त्यात अजित पवारांनी सांगितलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलं...
दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन.
All Shows


































