Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण झाली. देश विकासाच्या नव्या पर्वात पोहोचला, मात्र नंदुरबारच्या सातपुड्यातील माणिबेली गाव आजही अंधारातच आहे. देशातील पहिल्या मतदाराची ऐतिहासिक ओळख जपणाऱ्या या गावात आजही वीज पोहोचलेली नाही. विशेष म्हणजे माणिबेलीपासून हाकेच्या अंतरावर गुजरातमध्ये विजेचा लखलखाट, आरोग्याच्या सुविधा, पाणी आणि दळणवळणाच्या सुविधा नागरिकांना सहज उपलब्ध आहेत; तर दुसऱ्या बाजूला मध्यप्रदेशातही विकासाची चाके फिरताना दिसतात. मात्र महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करताच विकासाचा प्रकाश जणू थांबतोय, अशी परिस्थिती आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील तब्बल ४०० च्या आसपास पाडे आजही वीजेपासून वंचित असल्याचे वास्तव समोर येत आहे. वीज पोहोचवण्यात अडथळा ठरत आहे तो दुसरा कोणी नाही, तर वनविभागाच्या परवानग्यांचा, शासनाच्या एका यंत्रणेमुळे दुसऱ्या शासकीय यंत्रणेच्या विकासकामांना अडथळा निर्माण होत असेल, तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही सातपुड्यातील आदिवासी नागरिकांना वीज, पाणी, आरोग्य आणि दळणवळणासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर विकासाचा प्रकाश या शेवटच्या गावपाड्यांपर्यंत पोहोचणार तरी कधी? माणिबेलीच्या अंधारातून आता हा सवाल संपूर्ण महाराष्ट्राच्या व्यवस्थेला विचारला जात आहे.