नैराश्यात गेलेल्यांसाठी मुंबई महापालिकेची खास हेल्पलाईन, मार्गदर्शानाने बरा होऊ शकतो मानसिक आजार!
निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई | 29 Apr 2021 11:00 PM (IST)

मागील वर्षी देशात लॉकडाऊन झालं ज्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांपासून मोठ मोठ्या व्यवसायिकांपर्यत सर्वांनाच जाणवला. यामध्ये प्रामुख्याने लॉकडाऊनमुळे झालेलं आर्थिक नुकसान आणि आरोग्य व्यवस्थेकडे झालेलं दुर्लक्ष या बाबी दिसून आल्या परंतु यासोबतच आणखी एक महत्त्वाचा घटक असणाऱ्या मानसिक आरोग्याकडे मात्र सर्वत्र दुर्लक्ष होताना पाहिला मिळालं. परंतु मुंबई महापालिकेनं ही बाब ओळखून वेळीच हेल्पलाईन सुरू केली होती. ज्याचा 70 हजार नागरिकांना फायदा झाला आहे.