Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report

महानगरपालिका निवडणूक अनेकांनी प्रतिष्ठेची बनवलीय. ती जिंकण्यासाठी सर्व हातखंडे वापरले जातायत. त्यासाठीच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपानं सर्वच राजकारण्याचं तोंड कडू झालंय. संक्राती सारख्या सणाला तरी राजकीय नेते विरोधकांसाठी तिळगुळ खरेदी करतील का असा प्रश्न होता. काय उत्तर मिळालं पाहुयात
मकरसंक्रांत हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहानं साजरा केला जाणारा सण.
सूर्याच्या संक्रमणाचं निमित्त साधत एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलण्याचा सण.
अशाच राजकीय संक्रमणाचा प्रयोग करत तब्बल दोन दशकांनी एकमेकांशी गोड बोलू लागलेल्या ठाकरे बंधूंनी आजच्या दिवसाचं निमित्त साधत मुंबादेवीचं दर्शन घेतलं.
मुंबादेवीचंं सहकुटुंब दर्शन घेऊन ठाकरे परिवारानं मतदानाच्या आदल्या दिवशी देवीचे आशीर्वाद घेतले.
पण संक्रांत असली तरी विरोधक मात्र ठाकरेंशी गोड बोलायला तयार नाहीत.
याआधी मुंबादेवीला कधी गेले होते. आईच्या देवळात जायचं आणि चित्र दाखवण्यासाठी करायचं. याआधी कधीही गेले नाहीत. मुंबादेवीच्या भक्तांचा अपमान त्यांनी केलाय. कुलस्वामिनीच्या जवळ पायऱ्या तात्कालिन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुरुस्ती देखील केल्या नाही. राजकीय स्वार्थासाठी जात आहे बाकी काही नाही. मतदारांना संवाद करायला आम्ही जाऊ असं ते बोलत नाही. मतदार मात्र तुम्हाला पाठ दाखवतील हेच यावरुन दिसतं))
याआधी मुंबादेवीला कधी गेले होते. आईच्या देवळात जायचं आणि चित्र दाखवण्यासाठी करायचं. याआधी कधीही गेले नाहीत. मुंबादेवीच्या भक्तांचा अपमान त्यांनी केलाय. कुलस्वामिनीच्या जवळ पायऱ्या तात्कालिन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुरुस्ती देखील केल्या नाही. राजकीय स्वार्थासाठी जात आहे बाकी काही नाही. मतदारांना संवाद करायला आम्ही जाऊ असं ते बोलत नाही. मतदार मात्र तुम्हाला पाठ दाखवतील हेच यावरुन दिसतं))