पद्म पुरस्कारावरून महाविकास आघडीत नाराजी, राज्य सरकारची शिफारस केंद्राने डावलल्याचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 27 Jan 2021 01:15 AM (IST)

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील 119 कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पण राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. त्यात उद्योगपती मुकेश अंबानीसह शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचेही नाव होते. ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या 98 नावांपैकी केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा बहुमान मिळाला.