Maharashtra Lumpy Special Report : 99 टक्के लसीकरण तरी लम्पीचा धोका कायम?
abp majha web team | 06 Dec 2022 09:23 PM (IST)

लम्पी आजाराने राज्यातल्या जनावरांना विळखा घातलाय. गेल्या पंधरा दिवसात 7 हजाराहून अधिक जनावरांचा मृत्यू झालाय. लम्पीचा धोका टळावा म्हणून लसीकरण मोहीम हाती घेेण्यात आली. 99 टक्के लसीकरणही पूर्ण झालं मात्र तरीही लम्पीचा धोका काही कमी झाला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.