Monsoon Session : अधिवेशन की आखाडा? गोंधळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपने भरवली अभिरुप विधानसभा
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2021 10:45 PM (IST)

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला काल सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाचा पाहिलाच दिवस वादळी ठरला. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झालं आहे. दरम्यान या सर्व घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. 'काल जे काही घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं.', असे म्हणत विरोधकांवर टीका केली आहे.