Kolhapur News : आजोबांची स्वप्नपुर्ती; 92 व्या वर्षी सरपंचपदाचा फेटा Special Report
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2021 09:25 PM (IST)

आयुष्यभर आपण एखादे स्वप्न उराशी बाळगतो आणि ते पूर्ण करण्यासाठी असंख्य प्रयत्न करतो पण तरी ही ते पूर्ण होत नाही. परंतु नशिबाचे फासे पलटतात आणि सगळी स्वप्न अचानक पुर्ण होतात. याचाच प्रत्यय आलयं कोल्हापूरच्या बापू कांबळे यांच्या सोबत. 1962 साला पासून 11 वेळा ग्रामपंचायत निवडणूक लढवुन देखील यश काही त्यांच्या पद्रात पडेना. अखेर विद्यमान सरपंचांनी व गावकर्यांनीच आजोबांना सरपंच करण्याच मनावर घेतलं. राज्य सरकारची परवानगी घेतली आणि आजोबांना 9 दिवसांरीता थेट सरपंच पदावर विराजमान करून त्यांच इतक्या वर्षांच स्वप्न पुर्ण केलं.