✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report

abp majha web team  |  25 Mar 2026 11:50 PM (IST)
ABP News

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report 


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


मार्च एप्रिल म्हणजे आंब्याचा सिझन मुंबई आणि एकूणच राज्यभरात कोकणातल्या हापूसची क्रेझ आहे. देवगड हापूस तर सर्वांचा फेवरेट मात्र यंदा लहरी हवामान आणि वातावरणातल्या बदलांमुळे केवळ 20% हापूस आंब्याचं उत्पादन निघणार असल्याचं बागायतदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे उत्पादन घटलं तर हापूसशी संबंधित सर्व व्यवसाय देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाहूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. हापूस आंब्याच्या कापलेल्या फोडी पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. पण यंदाच्या मोसमातलं हापूस आंब्याचं वास्तव समजल्यानंतर तुमचा हिरमोड झाल्याशिवाय राहणार नाही. तसंही आंबा व्यापाऱ्यांच्या तोंडचं पाणी आधीच पळालंय. कारण वातावरणाच्या लहरीपणाचा फटका कोकणाच्या राजाला बसलाय. कोकणातील आंबा उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी हापूसचं 20% उत्पादन निघणं ही कठीण आहे. यावर्षी थंडी चांगली पडली मोहोरही चांगला आला मात्र वातावरण बदललं आणि मोहोर करपायला सुरुवात झाली. खरं तर थंडीचा जोर जास्त राहिल्यामुळे यावेळी जे काय फ्लावरिंग झालेलं जो मोहोर आलेला तो मोहोर थंडी अति जास्त प्रमाणात असल्यामुळे धुकं जास्त असल्यामुळे दवाचं प्रमाण जास्त असल्यामुळे सगळा मोहोर करपून गेला आणि त्यामुळे एक 95% तरी उत्पादन कमी झालंय शेतकऱ्यांकडे 5 एक टक्के जो उत्पादन आहे आंब्याचं तेही अति उष्णता झाल्यामुळे आता तेही कुठेतरी त्याला जास्त हिट लागल्यामुळे तेही गळून पडायला लागलंय. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात हापूस आणि पूरक व्यवसायातून 2500 कोटींची उलाढाल होते. रत्नागिरी जिल्ह्यात 120000 हेक्टरहून अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात 34 ते 35000 हेक्टरवर तर रायगड जिल्ह्यात 11 ते 12000 हेक्टरवर आंबा लागवड होते. उत्पादनच घटल्यामुळे हापूसशी संबंधित सर्व व्यवसायही धोक्यात आलेत. आंबा कमी झाल्यामुळे 20% आंबा यंदा आहे. 20% आंबा झाल्यामुळे पुढे ट्रान्सपोर्ट वाल्यांना पण आंबा कमी झालाय. या टाइमिंगला आम्ही जवळ-जवळ आज 23 24 मार्च आहे. या टाइमिंगला आम्ही जवळ-जवळ 500 ते 600 पेटी मार्केटला पाठवत होतो. ती आता आमची कॅपॅसिटी 100 पेटींवर आलेली आहे. त्यामुळे जवळ-जवळ ट्रान्सपोर्ट वाल्यांना फटका बसलेला आहे. त्याच्या बरोबर गिरणी आहेत लाकूड जे खोके तयार करतात त्यांना सुद्धा हा फटका नक्की पडलेला आहे. कारण आंबा जवळ-जवळ 20% आल्यामुळे खोक्याची ऑर्डर पण कमी आलेली आहे. आंब्याचा प्रश्न खासदार सुनील तटकरे यांनी थेट लोकसभेत नेला. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी केली. कोकणातला हापूसचा आंबा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे अशा वेळेला 90% पीक यावेळेला गेलेला आहे केंद्र सरकारला माझी विनंती आहे कोकणावरती आलेला प्रसंग त्याच्यामुळे निर्यातीतून मिळून मिळणार आपल्याला परकीय चलन याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती फटका त्याठिकाणी बसणार आहे अशा वेळेला कोकणातील आंबा काजू नारळ सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेला राज्य सरकार मदत करेल की केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणावरची मदत ही काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचं काम करून एक सकारात्मक भूमिका घेतली तर देशाच्या उत्पन्नामध्ये भरीव पद्धतीची मदत करणाऱ्या कोकण वासीयांना दिलासा त्याठिकाणी मिळू शकतोय. तर सिंधुदुर्ग 23 मार्चला आंबा आणि काजू उत्पादकांना रस्त्यावर उतरावं लागलं याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला. 12 मार्चच्या मोर्चेच्या वेळेला सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री राणे स्वतः मोर्चेकर्यासमोर येऊन सांगून गेले दोन दिवसांमध्ये सरकार मदत जाहीर करेल. पण 10 दिवसानंतर सुद्धा सरकारनं मदत जाहीर केली नाही म्हणून 23 तारखेला मुंबई गोवा महामार्गावर कोकणातले शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. शेतकरी रस्त्यावर उतरले याला जबाबदार सरकार आहे. सरकारची बेपरवाही वृत्ती आहे. शेतकऱ्यांच्या या आसमानी संकटावर आता तोडगा निघणं गरजेचं आहे. ह्या वर्षी सारखं क्लायमेट गेल्या 25 वर्षात नाहीये आणि ह्या वर्षी सारख्या क्लायमेटमुळे फार समस्या निर्माण झालेल्या अशी परिस्थिती कधी नव्हतं म्हणजे एक वर्ष खूप हापूस येतो एक वर्ष कमी येतो अल्टरनेट बेरर येतो पण ह्यावर्षी फारच नुकसान झालेलं आहे. तर ह्यावर्षीचं एक टिपिकल वर्ष आहे ज्यावेळेला हापूसला खूप म्हणजे खूप दगा बसलेला आहे. कोकणच्या हापूस आंब्याला जगभरात तोड नाही मात्र या आंबट-गोड चवीच्या हापूसनं यावर्षी शेतकऱ्यांना घाम फोडलाय. व्यापारीही चिंतेत आहेत त्यामुळे शेतकरी परिस्थितीशी दोन हात करतोय त्याला सरकारनंही साथ देण्याची गरज आहे.  

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.