Hinjawadi Rain : आयटी पार्क की वॉटर पार्क? काय आहेत हिंजवडीच्या समस्या? Special Report

Hinjawadi Rain : आयटी पार्क की वॉटर पार्क? काय आहेत हिंजवडीच्या समस्या? Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्कला आता नवी ओळख मिळतीय तीही प्रशासनाच्या कृपेने. पहिल्याच पावसामध्ये हिंजवडी आयटी पार्क मध्ये चक्क वॉटर पार्क बनलाय. प्रशासनाचा भोंगळ कारभारामुळे काही मिनिटांच्या पावसान सुद्धा हिंजवडी पाण्यामध्ये बुडतीय. त्यामुळे इथं वाहन रस्त्यावरून धावतात की पाण्यातून वाहतात असा प्रश्न इथं काम करणाऱ्यांना पडतोय. पाहूया आमचा प्रतिनिधी नाजीम मुल्लाचा हा खास रिपोर्ट. पाण्यातली बस, पाण्यावर तरंगणाऱ्या या दुचाकी, मंडळी, हे पुण्यातल कोणतही वॉटर पार्क नाहीये तर ही दृश्य आहेत पुण्यातल्या हिंजवडी, जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून हिंजवडीची ओळख आहे, मात्र पावसाळ्यात या आयटी पार्कच रूपांतर होतं ते अशा वॉटर पार्क मध्ये आणि हिंजवडीचा. मध्ये काम करणारे कर्मचारी सतत तीन ते चार तास ट्राफिक मध्ये सतत रोज त्रास सहन करतायत, पाण्याचा निसरा नीट होत नाही, गव्हर्मेंट लक्ष नाहीये आणि इथे पेपरबाजी होते की बाबा आम्ही एवढे प्रोजेक्ट आणले हे लक्ष द्या ना आहे त्या प्रोजेक्टला वाचवा. आयटी पार्क म्हणून हिंजवडीचा चेहरा मोहरा बदलताना हिंजवडी आणि आजूबाजूच्या भागात नैसर्गिक नाले बुजून तिथे बांधकाम झालं. ड्रेनेज लाईनची खोली कमी झाली. मेट्रोच्या कामावेळीही दोन पिलर मध्ये. काम करतात पण पावसाळ्यात हिंजवडीतील अनेक रस्ते पाण्याखाली जातात. गैरसोईमुळे हिंजवडीतील कर्मचाऱ्यांचा दोन ते तीन तासांचा वेळ प्रवासातच जातो. हिंजवडीतील आयटी कंपन्या लाखो रुपयांचा कर भरतात. पण त्या बदल्यात प्रशासनाकडून कोणत्याही सोई सुविधा मात्र मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमच धोरण आमलात आणणार का? असा प्रश्न आयटी अभियंता संघटनानी केलाय. गेली दहा वर्ष झाले आम्ही या विषयावरती. आणि एम्प्लॉयजची जी समस्या आहे हे आपल लार्जेस्ट आयटी पार्क आहे. साधारण चार ते पाच लाख कर्मचारी इथे काम करतात तर त्या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही फॅसिलिटी देऊ शकत नसाल तर निदान वर्क फ्रॉम होम तुम्ही आपरू करा. हिंजवडी आयटी पार्कन जगाच्या नकाशावर देशाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. इथल्या आयटी कंपन्यांमुळे सरकारला भरमसाठ करही मिळतो पण त्याच आयटी पार्कच आपलं प्रशासन असं वॉटर पार्क करू पाहतय ही परिस्थिती वेळीच हाताळली नाही. तर भविष्यात इथल्या कंपन्या स्थलांतरित होतील आणि भावी पिढीलाही त्याचा फटका बसण्याची भीतीही व्यक्त केली जाते. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, हिंजवडी, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.